Posts

Showing posts from August, 2017

सहवास

*💢     सहवास   💢* ------------------------------- एखाद्या चा सहवास खुप मोलाची गोष्ट आहे. आपल्याला कुणासोबत सहवासाची अपेक्षा आहे..हे पहिले निश्चित करावे. कारण सहवास हा संक्रमण असतो..तो जर चांगला असेल तर खुप काही शिकवतो पण जर वाईट असेल तर खुप काही बिघडवतो.सहवास कसा करावा..कुणाशी करावा..तो विश्वासपात्र आहे ना कि तात्पुरता तो चांगले पणाचे नाटक करत आहे..हे समजुन घेयला हवं...सहवासाचा परिणाम जेवढा हितकारी आहे तेवढास विध्वंसकारी.मित्र असावे चांगले नको ते व्यसनी यासाठीच म्हणले जाते.संताचा सहवास करतो जीवन हे सार्थक असेही म्हणतात. कारण सहवास हा खुप गरजेचा आहे... मित्रमंडळी,नातेवाईक ,परिवार यांचा सहवासातच माणसाचे जीवन कटिबध्द असते...तो ज्या सहवासात वावरतो तो तसा होऊन जातो.सत्संग करा जीवनाचा उध्दार करा यासाठीच म्हणले जाते. सहवासात खुप शक्ती असते.चांगला सहवासाने जीवन मार्गी लागते.आजारी माणसाला ही प्रेमाचा सहवास त्याचे आजार बरे करण्यात मदत करत असतो.जर एखादी व्यक्ती खराब असेल .जर त्याला आपण आपल्या चांगल्या सहवासाचे ओषध दिले तर त्याचे मन परिवर्तन ही होऊ शकते.एका मंदिरात रात्री किर...

आपले मन

   🔅  आपलं मन 🔅 -----------SK----------- * जेव्हा जपता हे मन तेव्हा होते ते अधीर ..सैरवैर धावण्यासाठी असतो त्यात उगाच हट्ट..नको वाटे त्याला कशाचे बंध...फक्त फिरावे मुक्त मनसोक्त ...* हे आपले मन जसे घडवेल तसे आपण घडतो ..तो जसा म्हणेल तसे आपण पळतो..आपण मनाच्या अधीन का मन आपल्या अधीन काहीच कळत नाही . फक्त चालत राहतो..तो जसा म्हणेल तसे करत राहतो.हे मन ना खुप चंचल असतं बरं का..त्याला जर मोकळं सोडलं तर तो सुटलेल्या बैलासारखं असतो .केव्हा शेत खराब करेल सांगता येत नाही ..तसे मन केव्हा आपले डोके खराब करील सांगता येत नाही. आपण मनाच्या नाही तर मन आपल्या ताब्यात पाहिजे.आपण जे म्हणेल तसेच त्याने वागले पाहीजे. उगीत त्याची दादागिरी सहन करायची नाही..आपले मन जेव्हा आपल्या अधीन होतं ना तेव्हा ह्या विश्वात असे काही नाही की तुम्ही ते करू शकत नाही. ज्याने मनावर ताबा मिळवला तो एकाग्रता मध्ये उच्चस्तरीय होऊन जातो..आणि एकाग्रता जर सिध्द झाली की,आपण सर्व काही संयमपणाने करू शकतो.आपल्या आध्यात्मिक वृत्तीतही मनाला फार मोठे स्थान आहे .कारण मन एकचित्त झाल्याखेरिज साधनेत एकाग्रता येत नाही.त्या...

मैत्री

{   °   मैत्री    °   }  °°°°°°°°°°°°°°°° मित्र म्हणजे काय तर मित्र म्हणजे आपल्या जीवनातले एक अंगच असतात. मित्राशिवाय राहणे म्हणजे सुंदर अश्या बागेत बसल्यावर एकही फुल न दिसणे.सगळीकडे भकास व उदासीनता वाटणे.मनुष्यजन्म घेऊन जर मित्रनाते जर नाही मिळवता आले तर जन्म व्यर्थच म्हणावा लागेल..साक्षात कृष्णालाही मित्राची महती माहीत होती.म्हणुन सुदामा सारखा मित्र आल्यावर साक्षात ईश्वरपण आपले आसन सोडुन त्याला भेटायला गेले. मित्र म्हणजे मित्रच असतो  त्यात गरीब ,श्रीमंत ,अपंग,काळागोरा ..असे काही नसते..जो यात भेदभाव करतो.तो या मित्रत्वाच्या नात्याला कलंक असतो. *लहानपणापासुन काॅलेजपर्यत व काॅलेजपासुन मरणापर्यत जो या मैत्री नात्याला पाळतो तोच सर्वात श्रीमंत असतो.*आयुष्याच्यावाटेवर बरेच मित्र येतात व काही मित्र अर्ध्यारस्त्यात सोडुन देतात ..पण जो मित्र आयुष्याच्या रस्त्यावर शेवटपर्यंत चालतो तोच खरा मित्र मानला जातो.मैत्रीला काय लागतं.. एक विश्वास जो अखंडपणे दिवासमान सदैव तेवत राहावा. कोणत्याही वाऱ्याने डळमळीत न जाता अखंडपणे उजागर राहावा. मैत्री कशी असावी ..आरश...