Posts

Showing posts from 2017

प्रकृती आणि पुरूष वर्णन

   प्रकृती आणि पुरूष यांचे वर्णन ----------------------------------------- अष्टधा प्रकृति आणि क्षेत्रज्ञ या दोघांनाही तू अनादि-नित्य जाण. त्याचप्रमाणे बुद्धि, इंद्रिये, देह, इत्यादि विकारांस व सुख-दुःख-मोहरूप गुणांस तू ईश्वराच्या त्रिगुणात्मक मायाख्य प्रकृतीपासून झालेले समज.. कार्य-शरीर व करण-सर्व इंद्रिये, यांच्या कर्तृत्वाविषयी वरील प्रकृति निमित्त आहे, असे सांगितले जाते, त्याचप्रमाणे सुख-दुःखांच्या भोक्तृत्वाविषयी क्षेत्रज्ञ-जीव निमित्त सांगितला जातो. देहाची आरंभक-देह ज्यांच्यापासून उत्पन्न होतो ती भूते, विषय व शरीरे हे विकार हा येथील ‘कार्य’ शब्दाचा अर्थ आहे. त्याचप्रमाणे तेरा इंद्रिये व त्यांचा आश्रय करून राहणारे सुख-दुःख-मोहात्मक गुण, हा येथील ‘करण’ शब्दाचा अर्थ आहे. त्यांचे कर्तृत्व प्रकृतीला आहे. त्यांना उत्पन्न करणे या रूपाने ती त्यांचे कारण आहे. अशा कार्य, करण, कर्तृत्वामुळे प्रकृति संसारकारण आहे. पुरुष म्ह. जीव-क्षेत्रज्ञ-भोक्ता, सुख-दुःखांच्या भोक्तृत्वाचे निमित्त आहे. प्रकृति शरीरेंद्रियांच्या कर्तृत्वाने व पुरुष सुख-दुःखांच्या भोक्तृत्वाने संसाराचे निमित्त ह...

विविध आहार ,यज्ञ,दान,व तप

विविध आहार यज्ञ, तप व दान -------------श्री..कु..---------------- आयुष्य, मानसबल, शारीरबल, आरोग्य, सुख व प्रीति यांची वृद्धि करणारे, रसयुक्त, स्नेहयुक्त, देहांत परिणामरूपाने चिरकाल रहाणारे व हृदयाला प्रिय वाटणारे, असे आहार सात्विक लोकांना प्रिय असतात.अति कटु, आंबट, खारट, उष्ण, तिखट, रूक्ष - नीरस व दाहक म्ह. तोंडाची आग करणारे, असे आणि दुःख, शोक व रोग देणारे आहार राजस प्रकृतीला मनुष्याला आवडतात. [ या श्लोकांत राजस लोकांना आवडणारे आहार सांगितले आहेत. ‘अति’ शब्द कटु, आंबट, खारट इत्यादि सर्वांच्या मागे जोडावा. ] अर्धे कच्चे शिजलेले, रसरहित, दुर्गंधयुक्त, शिळे, आंबलेले, वास येत असलेले, उष्टे व अपवित्र असे अन्न तामस लोकांना प्रिय असते. [ राजस व तामस आहारांचा त्याग करून सात्विक आहारांचे ग्रहण करण्यासाठी येथे तीन प्रकारचा आहार सांगितला आहे.श्री कु ] फलाची आकांक्षा न करणार्‍या लोकांकडून शास्त्राच्या विधीने प्राप्त झालेला जो यज्ञ ‘मला हा अवश्य करावयास पाहिजे’, असे मनाचे समाधान करून केला जातो, तो * सात्विक यज्ञ * आहे.शास्त्रोक्त विधीवांचून असलेला ज्यांत अन्नदान केलेले नाही, मंत्ररहित, दक्षिण...

साधनेची वाट

साधनेतील वाट -------------------- एका अनोळखी गावात जेव्हा आपण चालत असतो.तेव्हा अचानक समोर कुणीतरी येतं.व आपल्याला काही कळायच्या आत काहीतरी सांंगतो व ते कळण्याच्या आत आपण दुसरीकडे हरवुन जातो..पण तो क्षण आपण विसरून जातो.आपली साधना ही अशीच काहीतरी अचानक येऊन सांगते..आपल्याला मार्ग व रस्ता दाखवते पण तिचे सांगणे   कळले तर आपण आत्मोन्नतीच्या मार्गावर बरोबर मार्गस्थ होतो . पण जर आपण तसेच चालत राहिलो वेळोवेळी साक्षात्कार होऊन जर तिथेच घुटमळलो तर तिथेच आपले पाय जमतात न आपण एका मुर्तीस्वरूर होऊन जातो. साधना करताना तिचे घटित हे आपल्या जीवनात व आपल्या आध्यात्मिक वाटेवर कशी प्रगती होते.ते पाहाणे गरजेचे आहे.आपण जी पायरी म्हणतो त्यावर एक एक पाऊल पुढे जाणे गरजेचे आहे.व ते पाऊल योग्य मार्गावर पुढे नेल्यास आपली उन्नती आवश्य होते.फक्त येणारी जाणीव याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे व त्यावर आनुसरण करणे हे क्रमप्राप्त आहे.मग यावरील सर्व प्रश्नांचे उत्तर हे मिळत राहाते.... * चिंतन व लेखन : श्रीधर कुलकर्णी *

दासबोधामधील मायेचे वर्णन

    दासबोधामधील_मायेचे_वर्णन --------------------------------------------- समर्थ रामदासस्वामीकृत दासबोधमध्ये माया कशी आहे याचे सुंदर विवरण सांगितले आहे..याचा संदर्भ मोठा आहे . काही संदर्भ मांडायचा प्रयत्न केला आहे. माया कशी आहे ? ..ह्या प्रश्नाचे उत्तर सांगायचे म्हणलं तर  माया चंचळ आहे . ती ईश्वराच्या संगतीत असते . माया सगुण ( गुणांनी युक्त) आणि साकार आहे; ती सम्पूर्णपणे विकारी म्हणजे सतत बदलणारी आहे . माया अनेक व अनेकरूपी आहे; विश्वाच्या रूपाने ती प्रगट होते . माया बहुरूपी व बहुरंगी आहे म्हणजे बहुरूप्याप्रमाणे अनेक रंगरूपे धारण करून ती व्यक्त होते. या सृष्टीची रचना मायेमुळे होते . *मूळमाया सूक्ष्म आहे .* जसे आकाशात मुळात नसणारे आभाळ अथवा मळभ अकस्मात येते, तसे मायेमुळे ब्रह्माच्या ठिकाणी दृश्य विश्व दिसू लागते . जसे आकाशात प्रचंड असे धुराचे डोंगर आभाळामध्ये दिसतात, तसे ही मायादेवी विश्वरूपी अवडंबर दाखविते. ज्याप्रमाणे वायूमुळे दृश्य असणारी धूळ आकाशात उडते, त्याप्रमाणे मूळमायेमुळे दृश्य जग दिसू लागते . या विश्वाच्या 'आदि-अंती एक देव आहे'; पण *'मध्येचि लाविली माव'...

चार देह

🌸 ..  चार_देह ..🌸 -------------------------- चार देह : (१) स्थूल (२) सूक्ष्म (३) कारण आणि (४) महाकारण. हे चार देह पिंडात आहेत. *(स्थूल, सूक्ष्म, कारण महाकारण। हे च्यारी पिंडीचे देह जाण ॥९.५.४)*. यातील स्थूल व सूक्ष्म देहातील तत्त्वे आणि कारण व महाकारण या देहांचे स्वरूप हा भाग रामदासस्वामींनी पुढीलप्रमाणे सांगितला आहे. (१) पहिला स्थूल देह :-   आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी या पंच महाभूतांच्या मिश्रणाने स्थूल देह बनलेला आहे. तो चर्मचक्षूंना दिसणारा आहे. या पंचमहाभूतांचे प्रत्येकी पाच गुण आहेत. ते गुणही साहजिकच स्थूल देहात अनुभवण्यास मिळतात. काम, क्रोध, शोक, मोह आणि भय हे आकाशाचे पाच गुण आहेत. चळण, वळण, प्रसारण, निरोध व आकुंचन हे वायूचे पाच गुण आहेत. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन हे तेजाचे पाच गुण आहेत. शुक्र, रेत, शोणित/रक्त, लाळ, मूत्र आणि स्वेद हे आपाचे (जलाचे) पाच गुण आहेत. आणि शेवटी अस्थि, मांस, त्वचा, नाडी व रोम (ऋ केस) हे पृथ्वीचे पाच धर्म आहेत आता, प्रत्येक पाच भूतांचे पाच गुण किंवा धर्म हे प्रत्येकाचे असल्याने, एकंदर  २५ गुण किंवा धर्म या स्थूल...

भाव हा महत्वाचा

     भाव हा महत्वाचा ------------------------------- एक विषय असा असतो तो कधीच लक्षात येत नाही .पण त्याची जाणीव मात्र चेहऱ्यावर दिसुन येते . एखादा सुखद वा दुखद प्रसंग जेव्हा समोर येते तेव्हा तो पटकन चेहऱ्यावर उमटुन जातो.राग , माया, प्रेम, भिती, वा इतर सर्व प्रकारात तो दिसुन येतो पण त्यातील सखोलता लक्षात येत नाही.कारण ते कळायला त्या सोबत तसा सखोल संबंध असावा लागतो.म्हणुन तो चेहऱ्यावर असताना त्याचे महत्व आपोआप समजु लागते. कारण तो भावच असतो जो वेळोवेळी आपल्या चेहऱ्यावर प्रकट होत असतो.व त्याचे परिणाम ही त्यानुसार प्रकट होत असतात.. जसा भाव तसा देव ... या उक्ती प्रमाणे जसा भाव असतो तसेच सर्व आपल्याला दिसत असते...मुखी  जर प्रेमभाव असेल तर सर्व जग प्रेममय दिसते... या विश्वात देव ही कणकणात भरलेला आहे असा भाव ठेवल्यास तसेच ते  दिसत असते..म्हणुन हा जो भाव आहे तो सकारात्मक ठेवावा.म्हणजे जसे जग पाहाल तशी वृत्ती आपल्या अंगात वावरते.भाव हा महत्वाचा असतो व तोच जीवनात आपला स्वभाव कसा आहे तो सांगतो..व भाव हाच जिथे वसतो तिथल्या गुणाचा तो अवलंब करत असतो. तुम्ही रागीट असताल तर भा...

श्रध्दा :- विज्ञानाचा पाया

  श्रध्दा :- विज्ञानाचा पाया -------------------------------------- *कारणं विना कार्यं न सिध्यति |* असा शास्त्राचा सिद्धांत आहे.कारणाशिवाय कोणत्याही कारणाची निर्मिती होत नाही. प्रत्येक दृश्य कार्यामागे त्या कार्याचे कारण व ते कार्य निर्माण करण्यामागचे काहीतरी प्रयोजन हे असतेच. व्यवहारामध्ये आपण पाहतो की, साधी एक छोटीशी टाचणी जरी दिसत असेल तरी त्यामागे टाचणी निर्माण करणारा कोणीतरी करता हा असलाच पाहिजे. तसेच टाचणीच्या निर्मितीमागे निश्चित असे काहीतरी प्रयोजन आहे. उगीचच विनाकारण टाचणी बनविली जात नाही. त्या टाचणीचा काहीतरी विशेष उपयोग आहे. इतकेच नव्हे तर टाचणी बनविताना, ‘ती कशी असावी?’, ‘टाचणीची लांबी, जाडी, वजन, आकार कसे असावे?’, याचा व्यवस्थित विचार करूनच निर्मिती केली जाते. यावरून स्पष्ट होते की, विश्वामधील एखाद्या छोट्या वस्तुमागे सुद्धा कारण हे आहेच. तर मग हे इतके विशाल, जगड्व्याळ विश्व, निसर्ग, सूर्य-चंद्र-ग्रह-तारे-नक्षत्र हे सर्व कार्य दिसत असेल तर मग यामागे निश्चितपणे विश्वाचे काहीतरी कारण हे असलेच पाहिजे. करणं विना कार्यं न सिध्यति | कारणाशिवाय कार्य अस्तित्वातच येऊ श...

काटकसर जीवनाची

   काटकसर_जीवनाची _______Shri________ काटकसर ..या शब्दातच काट्यावर चालणे किंवा मेहनत करताना सतत काटे टोचावे असाही होतो ..या शब्दाचा अर्थ चांगला आहे का वाईट काहीच कळत नाही पण सध्या या शब्दाचा अर्थ फक्त पैसा बचत हाच धरला जातो.व त्यावर अंमल ही केला जातो ...पण खरच एकच अर्थ असु शकतो ता या शब्दाचा..नाही काटकसर या वाक्याचे बरेच अर्थ निघतात.वेळेची काटकसर,खाण्याची काटकसर,पैशाची काटकसर .. सांगायचा मुद्दा हा आहे की, आपण जी काटकसर करतो ती खरच आपल्या सुखाची आहे.अर्थातच आहे असे काहीचे मत असते. बरेच लोक पैसा पाळुन असतात.. असे एेकण्यात येते..'पैसा पाळुन असतो"म्हणजे काय काय .. तो नुसता पाळायचाच का .. त्याचा वापर म्हणजे चांगल्या कामात वापर नाही का करायचा..*पैसा,वेळ, आयुष्य हे कुणासाठीही थांबत नसतो.ते सर्व फिरतच असते.. फक्त फरकच एेवढाच की ते जिथे विश्रांती घेतात तो थांबा आपण असतो.म्हणुन पोट मारून व जीव तोडुन काटकसर करण्याला काही अर्थच नाही.जी वस्तु तुमच्याच कामात येणार नाही त्या वस्तुची काटकसर कशाला करावी.. प्रत्येक व्यक्तीने मुक्तपणे जीवन जगले पाहिजे.आपल्या अवतीभोवती संकट ,किंवा आपले सहकार्...

विश्व व प्रेममय संगीत

   🎼 विश्व व प्रेममय संगीत  🎶 ------------------------------------------------ विश्वसंगीत अनंत काळापासून सुरू आहे. विश्वाच्या उद्गात्यापासून ते अलग नाही, क्षणभरही दूर नाही. परमेश्वराचा आनंद अनंत रूपे घेऊन प्रकट होत आहे. परमात्म्याच्या हृदयाचे कंप म्हणजेच आकाशातील शतरंग. या गाण्यातील प्रत्येक सुरात पूर्णता आहे. कोणताही सूर शेवटचा नसला तरी त्यात अनंतता भरलेली आहे. विश्वाच्या या मधुर संगीताचा अर्थ न कळला म्हणून काय झाले? तारांना बोटांचा स्पर्श होताच सर्व मधुरता, स्वरसंगीत प्रकट व्हावे तसेच हे नाही का? ही सौंदर्याची भाषा आहे. आलिंगनाची भाषा आहे. ही भाषा विश्वाच्या हृदयातून बाहेर पडते व सरळ आपल्या हृदयाला येऊन भिडते. काल रात्री मी अंधारात एकटाच उभा होतो. सर्वत्र असीम निःस्तब्धता. आणि त्या विश्वकवीच मधुर गान मी ऐकले. आणि जेव्हा शय्येवर येऊन पडलो व डोळे मिटले, तेव्हा माझ्या निद्रेतही जीवनाचा नाच चालू असेल, व माझ्या शान्त शरीरातील गान विश्वसंगीताला साथ देईल, माझे हृदय नाचत राहील, नसानसांतील रक्त उसळत राहील, माझ्या शरीरातील कोट्यवधी प्राणमय परमाणू प्रभूचा स्पर्श होताच त्या...

नियंत्रण रागावर

# नियंत्रण_रागावर ..* ---------------------------- एक छोटा मुलगा होता अतिशय रागीट आणि संतापी. थोडे काही मनाविरूद्ध झाले की संतापायचा. एके दिवशी वडिलांनी त्याच्या हातात एक पिशवी दिली आणि म्हणाले, यात हातोडी आणि खिळे आहेत. तुला राग आला की, तू सरळ जायचे आणि घराला कुंपण म्हणून जी भिंत घातली आहे, त्या भिंतीवर एक खिळा ठोकायचा. पहिल्याच दिवशी त्याने ३७ खिळे ठोकले. पुढच्या काही दिवसात तो रागावर नियंत्रण ठेवण्यास शिकला. त्याचबरोबर भिंतीवर ठोकल्या जाणाऱ्या खिळ्यांची संख्याही कमी झाली. पण त्याला जाणीव झाली की, रोज खिळे ठोकण्यापेक्षा रागावर नियंत्रण ठेवणे सोपे आहे. एक दिवस असा उजाडला की त्या मुलाला एकदाही राग आला नाही  आणि खिळा ठोकण्याची वेळ त्याच्यावर आली नाही. त्याने ही गोष्ट वडिलांना सांगितली. वडिलांनी त्याचे कौतुक केले आणि सांगितले की आता तू राग आवरलास की प्रत्येकवेळी तिथला एक खिळा काढायचा. मुलगा त्याप्रमाणे करू लागला. एके दिवशी तेथे एकही खिळा उरला नाही. मग त्याने ही बाब वडिलांना सांगितली. रागावर नियंत्रण ठेवण्याच्या गुणाचे वडिलांनी कौतुक केले. मुलगा आनंदी झाला. त्या दिवशी...

श्रध्दा

* 🔹......श्रध्दा.....🔹* -------------------------------------- या विश्वात प्रत्येक मनुष्य हा श्रध्दावान आहे.आस्तिक - धार्मिक मनुष्य श्रद्धावान आहे.  तसेच नास्तिक मनुष्यही श्रद्धावान आहे.  विज्ञानवादी व  बुद्धिनिष्ठ असणारा मनुष्यही श्रद्धावानच आहे.पापी , अधर्मी, व राक्षस सुध्दा हा श्रध्दावानच असतो फक्त त्याची श्रध्दा ही दृष्टपणा करण्यात असते.  मग यात फरक कोठे आहे? तर या सर्वांच्या श्रद्धेमध्ये फरक काहीच  नाही.  श्रद्धा ही श्रद्धाच आहे.  फक्त या सर्वांच्या श्रद्धेचे विषय भिन्न-भिन्न आहेत.  श्रद्धेचा आविष्कार भिन्न-भिन्न आहे.त्याचे फक्त प्रकार वेगळे म्हणता येईल पण त्या श्रध्देचा भाव हा एकच असतो..कोण धार्मिक दृष्टी तर कोन अधार्मिक दृष्टी प्रत्येकाची कुणावर ना कुणावर श्रध्दा असतेच. एखाद्या मनुष्याची श्रद्धा स्वतःच्या आईवडिलांच्यावर असते एखाद्याची गुरू ,परमेश्वर, शास्त्रावर, ज्ञानावर, संतपरंपरेवर, संप्रदायावर असेल तर एखाद्याची श्रद्धा पैशावर असेल या उलट एखाद्याची सत्तेवर अलते, एखाद्या प्रिय व्यक्तीवर असेल, काही वेळेस मित्र-मैत्रीण-आप्त यांच्यावर...

सेवाभाव

  सेवाभाव ------------------ “सेवा” हा मनाचा असा एक भाव आहे की, सेवा करीत असतानाच आपल्याला आनंदाचा अनुभव येतो.  सेवा ही मनापासून म्हणजेच प्रसन्न मनाने केली जाते.  सेवा करावयाची असेल तर प्रथम, ज्याची मी सेवा करतोय त्याविषयी मनामध्ये नितांत श्रद्धा, दृढ विश्वास असला पाहिजे.  त्याशिवाय मी सेवा करूच शकत नाही.  त्या श्रद्धास्थानामध्ये मी नतमस्तक झाले पाहिजे.  तिथेच माझे व्यक्तिगत रागद्वेष, आवड-नावड, हेवे-दावे गळून पडतात.  माझ्यामधील अहंकार, अभिमानाची वृत्ति त्या स्थानामध्ये गळून पडते.  तिथेच मनुष्य नम्र, विनयशील होतो.  तिथेच पूर्णभावाने समर्पित होतो.  मग ते स्थान कोणतेही असो.  मातृसेवा, पितृसेवा, गुरुसेवा, राष्ट्रसेवा, ईश्वराची सेवा यांपैकी कोणतीही सेवा असेल.  आई वडीलांची सेवा करणारे वा देशाची सेवा करणारे थोर विर पुत्र हे आपल्यासमोर उदाहरणे आहेच.सेवा करताना निष्काम भावनेतुनच करावी तरच ती सेवा मानली जाते... पुर्ण समर्पित भावनेने सेवा करावी. सेवा करताना आपणास व्यावहारिक दृष्टीने कितीही निकृष्ठ कर्म करावे लागले तरी आपल्याला त्याची...

नात्याला ताजेपणा द्या

* नात्याला ताजेपणा द्या..! * ------------------------------------- कोणतीही गोष्ट शाश्वत नसते असे म्हटले जाते. नात्याच्या बाबतीतही हे खरे आहे. सुरुवातीला प्रेमाच्या नात्यामध्ये आपुलकी, जिव्हाळा, ओढ, काळजी या सर्व भावना ओतप्रोत भरलेल्या असतात. काळ पुढे सरकतो तशा या भावना हळूहळू बोथट होऊ लागतात. एकमेकांबद्दल क्षणोक्षणी विचार करणार्‍या पती-पत्नीचे एकमेकांकडे दुर्लक्ष होऊ लागते. हे केवळ पती-पत्नीच्या बाबतीत नव्हे तर प्रियकर-प्रेयसीच्या बाबतीतही घडते. स्त्रिया जास्त भावूक असल्याने त्याचे आपल्यावर पूर्वीसारखे प्रेम उरलेले नाही हा विचार त्यंना सतातवत राहतो. मात्र, नात्याचा हा तिढा कसा सोडवावा हे उमगत नाही. पतीचे आपल्यावरील प्रेम पूर्णपणे संपुष्टात आलेले नसले तरी ते कमी झाले आहे, हे वारंवार जाणवते. अशा वेळी डोके धरुन बसण्यात काय अर्थ आहे? चला, नात्याला थोडा ताजेपणा देऊ या! नात्यात तोचतोचपणा येण्याला दोघेही जबाबदार असतात. दोघांना एकमेकांना सतत दोष देण्याची सवय लागलेली असते. वारंवार दोष दिल्याने एकमेकेंबद्दल द्वेष निर्माण होऊ लागतो. हे टाळण्यासाठी सर्वप्रथम दोष देणे थांबवले पाहिजे. आपली चूक...

एक .. वेळ

       एक_वेळ .. --------------------- एक वेळ अशी होती की ती वेळच आपली नव्हती , माणसे ,नाती,सर्व परकी होता. उणिवा काढण्यातच त्यांची महती होती.असुन परकं करून टाकणारी भावकी होती.चुक समजुन सांगण्यात त्यांची इच्छा नव्हती. इच्छाच काय तर मायाच नव्हती.फक्त नावं ठेवण्याची मात्र त्यांच्यात गुणवत्ता होती.आपण त्यांच्या पात्रतेत नाही म्हणुन सारखे त्यांना वाटत असते.गेलोच कधीतरी तर नाके मुरडायची भारी हौस असते.एक वेळ अशी होती की, त्यांच्या सुशिक्षित पुढे आपला अडाणीपणा शोभत नव्हता.त्यांच्या टापटीप पुढे आपला गावरानपणा जमत नव्हता.काय तर काय कधी आपलीच बोलीभाषा पटत नव्हती. *"काय वाटे कुणास ठाऊक , काटा रूते कुठे देवास ठाऊक"*होते तर सारे तरी नसल्यासारखे वाटे कुणी हक्काने कान पकडावे असे असुन नसल्यासारखे होते.एक वेळच अशी असती की आपले परके होतात व परके आपलेच असतात. आता वेळ अशी की त्यांना कुठे रूतले कुणास ठाऊक विचारणा माझी होऊ लागते... खराब म्हणता म्हणता कधी त्यांच्या पात्रतेत बसायला लागतो तेच कळत नाही. किमया कसली कळतच नाही. आणि हे घडले कसे ते ही समजत नाही.सुशिक्षितपणा पुढे आम्ही अडाणी ...

असा हा एकांत

  असा_हा_एकांत ----------------------  ज्याला हवाय त्याला न मिळणारा, आणि ज्याला नकोय त्याची साथ कधीही न सोडणारा नदीकिनारी, थंडगार निसर्गात हवा हवासा वाटणारा , रात्रीच्या वेळी कुत्र्याच्या रडण्याप्रमाणे काळजात घर करणारा असा हा एकांत  मनाला वाऱ्याच्या हिंदोळ्यावर अलगत डोलावणारा , खवळलेल्या समुद्रात हेलकावे घ्यायला लावणारा असा हा एकांत..  आपणहून सुखाच्या गर्तेत गुंग होऊ पाहणारा , त्याच चक्रव्युहातून बाहेर पडण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा पक्ष्यांचा चिवचिवाट मधुर गाण्यासारखा भासणारा , तोच चिवचिवाट, जीवन किती बेसूर आहे याची जाणीव करून देणारा असा हा एकांत .. येणाऱ्या आयुष्याकडे आशेने पाहायला शिकवणारा , आयुष्यभर होऊन गेलेल्या चुकांचा शोक करत बसणारा  एकांत चेहऱ्यावर हास्याची रेघ ओढणारा , तीच रेघ हळूच अश्रूंनी मिटवणारा असा हा एकांत.. निर्जीव जीवाला जगणं शिकवणारा , जगणाऱ्याला आतल्या आत मारणारा , मरत असताना ही त्या वेळेत येऊन बसणारा असा हा एकांत.. असा कसा हा एकांत.. प्रत्येकाच्या जीवनात येऊन तडफडतो..स्वताला सुखी राहता येत नाही म्हणुन आपल्यालाही वेदना देतो.. असा ...

कय कळतय कळतच नाही

.. काय कळतय कळतच नाही.. --------------------------------------- तुम्ही कधी जे सांगता ते वेगळे ठरते.जे ठरते ते वेगळे निघते.महत्व न दिल्यासारखे करून पुन्हा तेच.दिसते.मग सोंग दुसरीकडे.का बरं करायचे.महत्वपणाचा आव का. बरे आणायचे.जे सांगितले ते विपरित असते. सांगितलेले विचार एेकुन समोर गोंधळात येते.मग वेगळा भाव आणुन का सांगायचे जे अधिकच दृढ असते.मग समोर दुसरे का सांगायचे जे असुन नसल्यासारखे असते.कशापायी तेच कळत नाही.एक लाईन मधील अर्धी तुटलेली म्हणता म्हणता अचानक ती पुर्ण का वाटु लागते.का ती कधी तुटलेली नसते.फक्त समोर आपले मत मांडण्यासांठी काहीही बोलायचे असते.मग अचानक दिसुन येते की, जे सांगितले ते.विपरीत असते.महत्व तर असतेच पण नसल्यासारखे होते.मग राहते काय फक्त समोर सांगितलेले महत्वाचे गाऱ्हाणे जे उगीच वदवलेले असते.मग एकदा असे कधी झालेच नव्हते ते सांगुन मोकळे झाले की आपण सुटलो ही गोष्ट राहाते.मग ते तर तसेच पण समोरील व्यक्तीचा गोंधळ उडालेला असतो.आश्चर्यचकीत होऊन तो फक्त पाहात असतो.काय करावं कळत नाही मग कळत फक्त एवढं की जे सांगितले ते विपरीत असुन आपल्याला दुसरा विषयाने सांगितले.कधी महत्व असल...

संतोषता

* संतोषता * --------------:-D अनेकदा असे दिसते की सर्वसाधारण मनुष्य आपल्या आयुष्यात नेहमी असमाधानी असतो. जे आहे त्यात समाधान न मानता अजून अपेक्षा करत बसतो. अशाने एक प्रकारची वखवख त्याच्या अंगात भिनते. आपल्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत की मग दुसर्‍याच्या उत्कर्ष पाहून त्याचा जळफळाट होतो. दिवसरात्र अतृप्त इच्छांचे विचार आणि त्या पूर्ण करण्यासाठी जीवाचा आटापिटा यातच त्याच्या आयुष्यातील बराच काळ निघून जातो. प्रत्येक व्यक्तीने संतोष अंगी बाणवला पाहीजे. हा फार महत्वाचा गुण आहे.संतोषता म्हणजे आहे त्यात समाधान मानणे.आहे त्या परिस्थित संतुष्ट राहणे.जेवढे आपल्या हातात आहे. तेवढ्यात संतुष्ट राहणे..एक व्यक्ती दररोज दोनशे रूपये कमावतो.त्या दोनशे रूपयात प्रपंच,उदरनिर्वाह,सर्वसोयीयुक्त भागत असे.समाधानी परिवार ,सुखी परिवार या उक्तीप्रमाणे त्यांचा लौकिक असायचा .पण हळुहळु कर्त्याला त्यातही असंतोष जाणवे .अधिक मिळण्याच्या अट्टाहासापायी तो कधी वाईटमार्गाने गेला त्यालात कळले नाही. मग काय ..वाईट सवयींचा परिणाम घरातही होऊ लागला.कालपर्यत दोनशे रूपये कमावणारा आज अचानक हजार रूपये कमावता झाला तेपण वाईट मार्गाने...

सहवास

*💢     सहवास   💢* ------------------------------- एखाद्या चा सहवास खुप मोलाची गोष्ट आहे. आपल्याला कुणासोबत सहवासाची अपेक्षा आहे..हे पहिले निश्चित करावे. कारण सहवास हा संक्रमण असतो..तो जर चांगला असेल तर खुप काही शिकवतो पण जर वाईट असेल तर खुप काही बिघडवतो.सहवास कसा करावा..कुणाशी करावा..तो विश्वासपात्र आहे ना कि तात्पुरता तो चांगले पणाचे नाटक करत आहे..हे समजुन घेयला हवं...सहवासाचा परिणाम जेवढा हितकारी आहे तेवढास विध्वंसकारी.मित्र असावे चांगले नको ते व्यसनी यासाठीच म्हणले जाते.संताचा सहवास करतो जीवन हे सार्थक असेही म्हणतात. कारण सहवास हा खुप गरजेचा आहे... मित्रमंडळी,नातेवाईक ,परिवार यांचा सहवासातच माणसाचे जीवन कटिबध्द असते...तो ज्या सहवासात वावरतो तो तसा होऊन जातो.सत्संग करा जीवनाचा उध्दार करा यासाठीच म्हणले जाते. सहवासात खुप शक्ती असते.चांगला सहवासाने जीवन मार्गी लागते.आजारी माणसाला ही प्रेमाचा सहवास त्याचे आजार बरे करण्यात मदत करत असतो.जर एखादी व्यक्ती खराब असेल .जर त्याला आपण आपल्या चांगल्या सहवासाचे ओषध दिले तर त्याचे मन परिवर्तन ही होऊ शकते.एका मंदिरात रात्री किर...

आपले मन

   🔅  आपलं मन 🔅 -----------SK----------- * जेव्हा जपता हे मन तेव्हा होते ते अधीर ..सैरवैर धावण्यासाठी असतो त्यात उगाच हट्ट..नको वाटे त्याला कशाचे बंध...फक्त फिरावे मुक्त मनसोक्त ...* हे आपले मन जसे घडवेल तसे आपण घडतो ..तो जसा म्हणेल तसे आपण पळतो..आपण मनाच्या अधीन का मन आपल्या अधीन काहीच कळत नाही . फक्त चालत राहतो..तो जसा म्हणेल तसे करत राहतो.हे मन ना खुप चंचल असतं बरं का..त्याला जर मोकळं सोडलं तर तो सुटलेल्या बैलासारखं असतो .केव्हा शेत खराब करेल सांगता येत नाही ..तसे मन केव्हा आपले डोके खराब करील सांगता येत नाही. आपण मनाच्या नाही तर मन आपल्या ताब्यात पाहिजे.आपण जे म्हणेल तसेच त्याने वागले पाहीजे. उगीत त्याची दादागिरी सहन करायची नाही..आपले मन जेव्हा आपल्या अधीन होतं ना तेव्हा ह्या विश्वात असे काही नाही की तुम्ही ते करू शकत नाही. ज्याने मनावर ताबा मिळवला तो एकाग्रता मध्ये उच्चस्तरीय होऊन जातो..आणि एकाग्रता जर सिध्द झाली की,आपण सर्व काही संयमपणाने करू शकतो.आपल्या आध्यात्मिक वृत्तीतही मनाला फार मोठे स्थान आहे .कारण मन एकचित्त झाल्याखेरिज साधनेत एकाग्रता येत नाही.त्या...

मैत्री

{   °   मैत्री    °   }  °°°°°°°°°°°°°°°° मित्र म्हणजे काय तर मित्र म्हणजे आपल्या जीवनातले एक अंगच असतात. मित्राशिवाय राहणे म्हणजे सुंदर अश्या बागेत बसल्यावर एकही फुल न दिसणे.सगळीकडे भकास व उदासीनता वाटणे.मनुष्यजन्म घेऊन जर मित्रनाते जर नाही मिळवता आले तर जन्म व्यर्थच म्हणावा लागेल..साक्षात कृष्णालाही मित्राची महती माहीत होती.म्हणुन सुदामा सारखा मित्र आल्यावर साक्षात ईश्वरपण आपले आसन सोडुन त्याला भेटायला गेले. मित्र म्हणजे मित्रच असतो  त्यात गरीब ,श्रीमंत ,अपंग,काळागोरा ..असे काही नसते..जो यात भेदभाव करतो.तो या मित्रत्वाच्या नात्याला कलंक असतो. *लहानपणापासुन काॅलेजपर्यत व काॅलेजपासुन मरणापर्यत जो या मैत्री नात्याला पाळतो तोच सर्वात श्रीमंत असतो.*आयुष्याच्यावाटेवर बरेच मित्र येतात व काही मित्र अर्ध्यारस्त्यात सोडुन देतात ..पण जो मित्र आयुष्याच्या रस्त्यावर शेवटपर्यंत चालतो तोच खरा मित्र मानला जातो.मैत्रीला काय लागतं.. एक विश्वास जो अखंडपणे दिवासमान सदैव तेवत राहावा. कोणत्याही वाऱ्याने डळमळीत न जाता अखंडपणे उजागर राहावा. मैत्री कशी असावी ..आरश...

इंद्रधनुष्य

🌈   इंद्रधनुष्य    🌈⛅ __________________🌈 इंद्रधनुष्य़ बघून फुलारून आला नाही असा माणूसच विरळा. ते वातावरणही फूलारून येण्यासारखंच असतं. शाळेत असताना *" तानापिहीनिपाजा *" हे नेहमी एेकण्यात येत असत.सुरूवातीला त्याचा अर्थ मला कळत नसे पण हळुहळु त्या शब्दाचा उलगडा झाला व ते शब्द म्हणजे इंद्रधनुष्याच्या रंगाचे संक्षिप्तकरण होते हे मला समजले..वातावरण ढगाळ असले व पाऊसाची रिमझिम सुरू झाली की, एक रंगबिरंगी पट्टा आकाशात येत असे.तो इतका सुंदर व मनमोहक असे . तो पट्टा म्हणजे जणु आकाशाने घातलेली फुलांची माळच वाटे व त्यातील रंगाने ते अधिकच खुलत असे.त्यातले रंग म्हणजे जीवनात जणु सौदर्य खुलवणारे असत व ते रंग इतके आकर्षक वाटे की,यापुढे सर्व फिक्के वाटे. तांबडा,नारंगी,पिवळा,हिरवा,निळा,पारवा ,जांभळा .. म्हणजेच तानापिहिनिपाजा ..या रंगाने मिळुन एक पट्टा निर्माण होत असे ..आकाशात तुषारीवर पडणाऱ्या सुर्यकिरणाच्या योगाने दिसणारी धनुष्याकृती  त्यालाच आपण इंद्रधनुष्य म्हणत असतो..प्रकाशकिरणांचे वक्रिभवन व परावर्तन या योगाने इंद्रधनुष्य पडत असते. शाळेत असताना याचे रंग लक्षात ठेवायचे खुप...

चुकीचे प्रायश्चित

* चुकीचे प्रायश्चित * _____Shri______ सर्वात अवघड काय म्हणले तर आपण केलेल्या चुकीचे प्रायश्चित करणे.काही चुका मिटुन जातात पण काही चुका मिटता मिटत नाही.ते सतत आपल्या पाठिमागे असतात.कितीही सावरण्याचा प्रयत्न केला तरी ते सावरत नाही व ते आपण केलेल्या चुकीची पुनरावृत्ती होतच राहते.त्यामुळे प्रत्येकाने सारासार विचार करूनच पाऊल टाकावे. आपले एखादे पाऊल हे आपल्यासाठी व घरच्यांसाठी त्रासदायक ठरू शकते.एखादा चुकिचा निर्णय हा आयुष्यातला तापदायक ठरू शकतो व आपण कितीही सावरण्याचा प्रयत्न केला तर ते सावरत नाही. एखाद्या वेळेस सर्व सावरून व्यवस्थित चालते पण मतभेद असल्याने वादाला तोंड फुटल्याशिवाय राहात नाही.अशी चुक खुप वेदनादायी असते.त्यात आपणच नाही तर पुर्ण घरभार पिडले जाते व आपण फक्त पाहातच राहातो कारण आपण काहीच करू शकत नाही व असह्य होऊन ते सोसत राहातो. एक परिवार गुण्यागोविंदाने असते .. त्या परिवारात एकाचे लव्हमेरेज होते.घरच्यांचा विरोध,किंवा संमती पण मनात असंमती देऊन त्याला स्विकार केलेले असते पण वैचारिक मतभेद असल्याने वारंवार वादावाद होतच राहात असते.स्वभावात मुलकीचा फरक असतो.एक दिवस सुखाचा तर ...

पाऊलवाट

* पाऊलवाट * ____________ लहाणपणी रानावनात फिरताना,रानात जाण्यासाठी एक-दोन फुटाची वाट असायची .त्या वाटेवर एकच माणुस चालेल एवढीचं जागा ..तरीही गर्दी नाही,आवाज नाही ,काही नाही फक्त मी आणि माझे सवंगडी धावायचे ,चालायचो मस्त फिरायचो..या झाडाच्या चिंचा झाल्या की त्या झाडापर्यत जाण्यासाठी या पाऊल वाटा खुप गमतीशीर वाटायच्या.मातीचे रस्ते ,भोवताली गवताची चादर तर कुठे झाडाझुडपांचा मेळा ,तर कधी भरल्या रानातून तर कधी उंच सखल शिवारातून पायी जाताना या वाटा तयार होतात. पहिल्यांदा जाणारा खाच खळग्यातून, अडथळ्यातून पार गेलेल्या असतो.अश्या वाटा नागमोडी सारखे त्याला झाडाच्या फांदीप्रमाणे मधी मधी फुटलेल्या वाटा खुपच मनमोहक वाटतात.पावसाळ्यातर या वाटेला   एक मोहक असे गवताची नक्षी येते व ती पाऊलवाट्याला अजुन रमणीय बनवते.मऊशीर मातीतून गेलेल्या पाऊलवाटेने अनवाणी चालताना वेगळीच मजा येते. पायाला माती गुदगुल्या करत असते. कधी ढेकळे पायाला शिवाशिवी करत असतात. ढेकळात खालीवर होणारे पाय थकवा जाणवू देत नाहीत. तिथल्या शुध्द हवेत मन कसे आनंदी व प्रसन्न होऊन जाते.रानातल्या पाऊलवाटा ह्या जणु रानावनाचे आभुषणच वाटतात.ख...

जीवनात संयम हवा

* जीवनात संयम हवा ?* ________Shri________ प्रत्येकाच्या जीवनात संयम हवाच.संयम ही यशाला शिखरावर नेऊन बसवते.घर असो की आॅफिस, वा शत्रु ..वार्तालाप करताना संयम हवा... आपण जे बोलतो ,वागतो,ते सर्व संयमित हवे.आयुष्यात संयमाला अनन्यसाधारण महत्वा आहे. जीवनात जर संयम नसेल तर क्रोध हा आपल्याला गिळंकृत करतो व आपण त्याचे गुलाम होतो,यासाठी रागावर संयम हवा.. नुसता रागावरच नाही तर खाण्यावर ,बोलण्यावर ,आचरणावर,पुजेत ,साधनेत संयम हवा... जर आपल्यात संयम असेल तर आपले जीवन सफल व यशस्वी होते.बोलताना आपण काय बोलतो ,कसे बोलतो,आपल्या बोलण्याने समोरील व्यक्ती नाराज नाही होणार याची काळजी घ्यावी .आपल्या बोलण्यात संयम असायला हवा.जर एखादा आपल्याला वाईट बोलत आहे . तर आपण त्या पातळीवर न जाता संयमाने त्या परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे. म्हणुन हाव भाव, बोलण्यात संयम हवा.. संयमित जीवन हे मधासारखे असते..आपण जर संयमित असेल तर कोणतेही परिस्थिती आपण सहज हाताळु शकतो.संयम हा अनमोल दागिना आहे जो प्रत्येकात असतो फक्त आपल्या धैर्याने तो कार्यान्वित होतो. *संयम असेल मनी..तो बोलण्याचा धनी* आपले आचरण नेहमी संयमित असावे ...

प्रपंच व परमार्थ

प्रपंच व परमार्थ ____Shri_____ प्रपंच व परमार्थ हा दोन्हीही जीवनात केला पाहिजे .प्रत्येकाचे अनन्यसाधारण महत्व आहे.नुसता प्रपंच केला व परमार्थ नाही केला तर ते जीवन व्यर्थच आहे व नुसते परमार्थ करण्यात काहीच अर्थ नाही .जर ते समाजसेवेत उपयोगी नाही,धर्म,अर्थ, काम,मोक्ष हे साध्य झाले का पुरूषार्थ प्राप्ती होते व ती साधना मजबुत करायला कामी येते.प्रत्येक आश्रम हे महत्तपुर्ण असते.संन्यासआश्रमात गृहस्थाचे जीवन वर्ज्य आहे, पण गृहस्थाश्रमात संन्यास विरक्ती पण चालते म्हणजे संसाराची मोह ,माया ,लोभ हे दुर केले पाहीजे,संत एकनाथ महाराजांनी प्रपंच व परमार्थाची विलक्षण सांगड घालुन संसारामध्ये असतानाच परमार्थ कसा करावा याची उत्तम शिकवण दिली आहे.व प्रपंच करूनच परमार्थाकडे वळावे , गृहस्थाश्रमात राहुनच सेवा व भक्ती योग्य रूपाने होते.आधी प्रपंच नंतर परमार्थ हा रस्ताच ठेवाव व त्या रस्त्यावरच चालण्याचा प्रयत्न करावा. संत रामदासस्वामी यावर सुंदर विवरण करतात.. * आधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावे परमार्थ विवेका । येथे आळस करू नका । विवेकी हो । । १२ -१-१* *प्रपंच सांडून परमार्थ कराल।तेणे तुम्ही कष्टी व्हाल...

मोक्ष व मुक्ती

   मोक्ष व मुक्ती ____Shri____ मोक्ष वा मुक्ती .. एका नाण्याचे दोन पैलु ...मोक्ष म्हणजे काय .. आपला  आत्मा परब्रह्मात लीन होणे .. मुक्ती म्हणजे काय.. आपला आत्मा जन्ममरणाच्या या संसारबंधनातुन मुक्त होणे ..पण दोन्हीचे वर्णन व उद्देश्य एकच आहे की, या संसारबंधनातुन सुटका .. हे कसे मिळते व यासाठी काय करावे लागते हाही प्रश्न च आहे. द्रव्याचे योगाने मोक्ष प्राप्त होण्याची आशा नाही, अशी श्रुति आहे. तद्वत् कर्माच्या योगानेही मुक्ति मिळण्याची आशा नाही असे स्पष्ट श्रुति सांगत आहे. *श्रद्धा, भक्ति आणि ध्यानयोग हे मुक्त होऊ इच्छिणाराला मुक्तीचे उपाय आहेत, असे साक्षात वेदवाणी सांगते.* जो या उपायांवरच अवलंबून राहतो, त्याची अविद्येने कल्पिलेल्या देहबंधनापासून सुटका होते.  देहाची बंधने म्हणजे ,वासना, एकात जीव अडकणे ,त्याचा आत्मा कुठेतरी गुंतुन बसणे ही मुक्ती नाही,ज्याच्या सर्व इच्छा व वासना संपुष्टात आल्या आहेत.आत्म्याला मागे वळुन बघायची गरच उरत नाही ती मुक्ती होय .व आत्म्याची भक्ती ही पहब्रह्मलीन होते तेव्हा त्यास मोक्ष मिळतो.अंतर फक्त एका स्टेशनच आहे अर्थ एक असला तरी विश्लेषण ...

संस्काराची जपवणुक

संस्काराची जपवणुक _______Shri________ संस्कार म्हणजे काय ? हा प्रश्नच पडला कसा काही कळेना पण सहजच मागील दिवसाची आठवण झाली..कसे संस्कार शिकवले जायचे..बसावे कसे,बोलावे कसे,खावे कसे,राहावे कसे हे सर्व संस्कारात शिकवले जायचे.व संध्या,शुभंकरोती प्रार्थना ह्याचेही उपक्रम चालायचे.उपक्रम म्हणजे नित्यक्रमच असायचे ते.जसे जसे युग सरकु लागले तसे यातील एकएक भाग बंद होत गेले व सर्व अॅडवांस होऊन बसले.मुलांना रात्री झोपताना मस्त परिकथा व छानछान गोष्टी सांगायचे ते पण आता जवळजवळ बंद होत चालले आहे. पण  पुर्ण संपले नाही तर काही ठिकाणी अजुनही हे नित्यक्रम चालु असतात.पण काही ठिकाणी ओढ कमी झालेली दिसते.प्रत्येकावर कामाचा बोझा एवढा वाढला आहे की,मुले ट्युशन मध्ये व्यस्त ,आईवडील कामात व्यस्त,तर आजीआजोबा कधी कामात... तर  आजकाल ते गावाकडेच असतात.मुलांचा व आजीआजोबांची भेटच सहासहामहिने होत नाही.तर दिनक्रम कसा येईल ..असो प्रत्येक युग हे नवीन जीवन व विचार घेऊन येतो .व त्याप्रमाणे सर्व चालत असते.पण याचा अर्थ असा नव्हे .. आपली संस्कार व संस्कृती चा ठेवा हा प्रत्येकाला जपलाच पाहिजे .. बिझी शेड्युल्ड मधुन ...

काटकसर जीवनाची

  काटकसर जीवनाची _______Shri________ काटकसर ..या शब्दातच काट्यावर चालणे किंवा मेहनत करताना सतत काटे टोचावे असाही होतो ..या शब्दाचा अर्थ चांगला आहे का वाईट काहीच कळत नाही पण सध्या या शब्दाचा अर्थ फक्त पैसा बचत हाच धरला जातो.व त्यावर अंमल ही केला जातो ...पण खरच एकच अर्थ असु शकतो ता या शब्दाचा..नाही काटकसर या वाक्याचे बरेच अर्थ निघतात.वेळेची काटकसर,खाण्याची काटकसर,पैशाची काटकसर .. सांगायचा मुद्दा हा आहे की, आपण जी काटकसर करतो ती खरच आपल्या सुखाची आहे.अर्थातच आहे असे काहीचे मत असते. बरेच लोक पैसा पाळुन असतात.. असे एेकण्यात येते..'पैसा पाळुन असतो"म्हणजे काय काय .. तो नुसता पाळायचाच का .. त्याचा वापर म्हणजे चांगल्या कामात वापर नाही का करायचा..*पैसा,वेळ, आयुष्य हे कुणासाठीही थांबत नसतो.ते सर्व फिरतच असते.. फक्त फरकच एेवढाच की ते जिथे विश्रांती घेतात तो थांबा आपण असतो.म्हणुन पोट मारून व जीव तोडुन काटकसर करण्याला काही अर्थच नाही.जी वस्तु तुमच्याच कामात येणार नाही त्या वस्तुची काटकसर कशाला करावी.. प्रत्येक व्यक्तीने मुक्तपणे जीवन जगले पाहिजे.आपल्या अवतीभोवती संकट ,किंवा आपले सहकार्...

भगवंत अवतार गुढ मत

भगवंतांचा अवतार व त्यासंबंदीत प्रश्न हे काही अंशी गूढ च असतात कधी सांगण्यात फरक तर माहीतीत बदल असू शकतो, भगवंतांचा जन्म व मृत्यू ही सर्व माया असती, ती न समजण्यासारखी आहे व फक्त त्या विषयाचा आनंद घेणे हाच जीवनामृत आहे. देवांचा जन्म होतो हे वेदांमध्ये उल्लेख असतो पण तो कसा जन्म घेतो हे प्रश्न गूढ आहे व अनंत जन्माचे चिंतन ही पुरेसे नाही. आपण फक्त जे वेदात व शास्त्रात दिले आहे. त्याचाच आधार घेऊ शकतो याव्यतिरिक्त दूसरे व्यक्तव्य व विधान आपण सांगावे हे उचित नाही व त्यास काही आपण पुरावा निशी सिध्द ही करू शकत नाही संपूर्ण विश्व व त्याची माहीती वेदपुराणात मिळते पण असे किती ब्रम्हांड देवात विराजमान असतात व त्याचा वेदांनाही त्याचा थांगपत्ता लागत नाही. *वेदांनाही नाही कळला, अंतपार, याचा कानडा राजा पंढरीचा* थोडक्यात सांगायचे तर आपण फक्त वेदपुराणानुसार देवाचे अवतार वर्णन करू शकतो पण तो कसा झाला हे अशक्य आहे, व हे एका जन्मात शक्यही नाही.देवाचे नाम घेयला पण अनंत जन्माचे पुण्य लागते, *ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मोनी पुण्य होय.* ©®  श्रीधर कुलकर्णी

श्रोता चे गुण व प्रकार

*श्रोता चे गुण व प्रकार* _________🔺________ *उत्तम* आणि *अधम* असे श्रोत्यांचे दोन प्रकार मानलेले आहेत. *चातक, हंस, शुक, मीन* इत्यादी उत्तम श्रोत्यांचे पुष्कळ भेद आहेत. *वृक, भूरूंड, वृष, उष्ट्र* इत्यादी अधम श्रोत्यांचे सुद्धा अनेक भेद सांगितले आहते. चातक ढगातून पाडणार्‍या पाण्याचीच जशी अपेक्षा करतो, त्याचप्रमाणे जो श्रोता सर्व काही सोडून देऊन फक्‍त श्रीकृष्णांसंबंधीच्या शास्त्रांचे श्रवण करण्याचे व्रत घेतो, त्याला चातक म्हटले आहे. हंस ज्याप्रमाणे पाणी मिसळलेल्या दुधातून शुद्ध तेवढे घेतो, त्याचप्रमाणे जो श्रोता अनेक गोष्टी ऐकून त्यातील सार तेवढे घेतो, त्याला हंस म्हणतात. ज्याप्रमाणे चांगल्या रीतीने शिक्षविला गेलेला पोपट आपल्या मधुर वाणीने शिक्षकाला तसेच येणार्‍या इतरांनासुद्धा प्रसन्न करतो, त्याचप्रमाणे जो श्रोता ऐकलेली कथा मधुर वाणीने आणि थोडक्या शब्दात दुसर्‍यांना ऐकवितो व त्यायोगे व्यास व इतर श्रोत्यांना आनंद देतो, त्याला *शुक* म्हणतात. जशी क्षीरसमुद्रातील मासोळी मौन धारण करून पापण्या न मिटता पाहात राहून दुग्धपान करते, त्याप्रमाणे जो श्रोता कथा ऐकताना डोळ्यांच्या पापण्याही न मिट...

नशीब आणि प्रारब्ध

नशीब आणि प्रारब्ध ______Shri______ पृथ्वीतलावर आपल्याला मनुष्यजन्म मिळाला हे आपलं *नशीब* आहे. तर त्या मनुष्य देहाचे आपल्याला सार्थक करता आले याला *प्रारब्ध* म्हणतात. नशीब आणि प्रारब्ध यात सर्रास लोक नशीब आणि प्रारब्ध हे एकच आहे असं मानतात. पण नशीब आपण घडवायचं असतं तर मनुष्यदेहात नशीब घडवण्यास आपल्याला आपलं प्रारब्ध मदत करत असतं, असं काही लोकांचं मत आहे. जन्माला आल्यापासून लोक नशिबाच्या फे-यात अडकतात. काही जण तर आपण या वेळेतच का जन्माला आलो असं म्हणत कपाळावर हात मारत बसतात. नशीब बदलावं यासाठी लोक आपलं कर्म (काम) बदलतात. पण नशीब हे सर्वस्वी प्रारब्धावर अवलंबून आहे, त्यामुळे धंदा-व्यवसाय किंवा काम बदललं की नशीब बदलेल याची हमी देता येणार नाही. या जगात नशिबाचे अनेक प्रकार आहेत. काही लोक आम्ही सदैव कमनशिबी आहोत असं म्हणत असतात. तर काही लोक आम्ही नशिबाला मानतं नाही. नशीब हा ज्याचा त्याचा मानण्या न मानण्याचा भाग असला तरीही त्याला प्रारब्धाशिवाय काही करता येत नाही. लोक म्हणतात, आम्ही जन्माला आलो, जगलो पण देहाचे सार्थक करता आले नाही. मग देहाचे सार्थक कसं करता येईल. यासाठी संतांनी विविध मार...

आजचे युग व प्रेमाची नाती

आजचे युग व प्रेमाची नाती ________Shri________ कधी वाटतं हे काय चालु आहे ..अवतीभोवती वातावरण कसे आहे..जिकडेतिकडे धावपळ ,गडबड नुसते घड्याळाचे चक्र फिरावे तसे सारखे पाय फिरत असतात..नाही कुठे थांबा तर नाही कुठे विश्रांती..नुसते पळायचे .. पळत पळत सुटायचे मागे काय राहिले आहे काय सुटले आहे कशाचीही काळजी नाही. फक्त पळायचं .जिंदगी ही एक चलती गाडी प्रमाणे सुटायचं..याला आजच्या युगातले जीवन म्हणायचे व मागील सुखाकडे दुर्लक्ष करायचे व वेळोवेळी भेटणाऱ्या सुखापासुन वंचित होयचे..याला आजच्या युगातले जीवन म्हणायचे का ?.. पळतापळता कुठेतरी धरपटडे जाते..नाहीतर कधीकधी रस्ता चुकले जाते.. विचार करण्यासाठीही वेळ मिळत नाही ..हेच का आजच्या युगातले जीवन म्हणायचे का ?.. आयुष्य जगावे असे त्यात मिळावे सगळे फळे ,कधी गोड कधी .कडु तर कधी आंबट तर कधी तिखट ..सर्व  रसाची चव चाखुन पुढे जावे.. जीवन हे एकदाच मिळते..क्षणाक्षणाला ते जगले पाहिजे..कसाही असेल क्षण तो आत्मसात केला पाहिजे..एका रस्त्यावर धावण्याच्या नादात आपण सुखाचे रस्ते सोडुन देतो ..इकडेतिकडे न बघती सुसाट पळत सुटतो.प्रेम,नाती,सुख शांती, हे रस्ते विसरून फ...

देहाची काळजी

                    देहाची काळजी                    ------Shri------- मला आज एक ओळखीचे गृहस्थ भेटले .सहजच गप्पा चालु होते व बोलताबोलता सहज ते म्हणालो माझे दोन दात बसवायचेा विचार आहे .पण डाॅक्टर खर्च खुप सांगत आहेत.मी म्हणालो"_किती सांगत आहेत..ते म्हणाले "_ डाॅक्टर जवळपास दोन्ही दाताचे मिळुन सोळा हजार रूपये खर्च येईल.. माझ्याकडे सध्या बसवायची परिस्थिती नाही . मी म्हणालो  " काय त्रास होत आहे का .. तो म्हणाला की .. जाम दुखतय काही खाताना ..थंड गरम काहीच लागु देत नाही .. सध्या पातळ पदार्थ खाऊनच भागवत आहे... _तेव्हा मला अचानक एक वाक्य आठवलं की हा देह आपल्याला देवाने फुकट दिला आहे त्याला काहीच किंमत नाही लावली_ मी त्याला म्हणालो .. जर दोन दाताचे सोळा हजार तर बत्तीस दाताचे किती होतील पण देवाने ते फुकट दिले आहे तरीही त्याचे आपण नाव घेत नाही व आभार मानीत नाही असे का .. हे तर फक्त दाताचा हिशोब बाकी अवयवाचा तर लांबच .. कितीही पैसा दिला तरी हा देह मिळत नाही. एखाद्याचे हाड तुटले व बसावयाला ह...
पाऊस :- माझा मित्र ..माझा सखा ___________________________ पाऊस .. जसे मनात प्रेमाची छायी भरते तसे आभाळाने भरून जातो .. एक एक थेंबात साठलेल्या  प्रेमाचा  हृदयात स्पर्श होतो तो पाऊस..चेहऱ्यावर सुखाचा शिडकावा करून शांतीचा आनंद देणारा पाऊस.. नात्यामध्ये बहर देणारा पाऊस..भिजताना प्रेमरूपी आपल्यावर वर्षा करणारा पाऊस..पाऊस हा मित्र माझा ...येतो जेव्हा भरून वाटे.. त्याच्या सानिध्यात जग विसरून जावे..त्याच्यासोबत चहाचा घोट घेताना.. पाऊस त्याच गोडवा ओते.. शांत सर्व परिसर वाटे..तुझी माझी त्यात काहुर वाढे..आस्वाद घेताना गरमभजीचा ..तुझा स्पर्श त्यात जाणवे..गरम भजी असुनही ती मला थंड वाटे..सहवास जणु तुझा जन्मोजन्मीचा..प्रत्येक जन्मात सखा तु माझा सोबतीचा...तुझे येणे मज जीवन पुर्ण होई.. थेंबाचा स्पर्श होताच सर्व काही विसरून जाई..मी आणि तु नात्यात बंधिले..साक्षात देवानेच ते  नाते गाेंदले..अष्ट महिन्याचा विरह आठ जन्मीचा लागे..मृगावर केव्हा येशील धावुन त्याची वाट मी पाहे..आज डोळे उघडताच तुझे दर्शन झाले .. वाट तु माझीच पाहात होतास असे वाटु लागले..किती काळजी रे तुला आपल्या नात्याची ..पण हल्...

नमस्काराचा महिमा

🙏 नमस्काराचा महिमा 🙏 …………………………… दररोज सकाळ - संध्याकाळ माता -पिता आणि गुरूजनांना नमस्कार केला पाहिजे, नमस्काराचा अपार महिमा आहे, *"अभिवादनशिलस्य नित्यं वृध्दोपसेविन :।"* *"।चत्वारी तस्य वर्ध्दन्ते आयुर्विद्यायशोबलम।।"* जो दररोज वडिलधार्याची सेवा करतो, त्यांना नमस्कार करतो आणि त्यांच्या शिकवणीनुसार वर्तन करतो त्याचे आयुष्य,विद्या, यश, आणि बळ चारही वाढते, एक सुंदर कथा सांगतो … …मृकंडु नावाचे ॠषी होते, त्यांचे पुत्र होते मार्कंडेय, ते बालपणापासुन पित्याच्या संस्कारानुसार माता-पिता, गुरूजन आणी संत-महात्म्यांना नमस्कार करीत असत.  एकदा एक सिध्द महात्मा त्यांच्याकडे आले, पिता बालक मार्कंडेय: "बाळ!या महाराजांना प्रणाम कर."बालक मार्कंडेयाने वाकून चरणस्पर्श केला आणि सिध्दपुरूषाची चरणरज मस्तकाला लावली, महात्मा त्या बालकाकडे एकटक पाहात राहिले, जणुकाही त्याच्या भावी जीवनावर दृष्टिपात करीत आहे! मृकंडु ॠषी ने विचारले :महाराज अशा प्रकारे एकटक काय पाहात आहात? "बालक तर सुंदर आहे;परंतु आयुष्य खूपच की आहे," एवढे बोलून त्या सिध्दपुरूषाने पुन्हा विषा...

चांगली झोप व उशी

*चांगली झोप आणि उशी यांचा घनिष्ठ संबंध आहे.* उशी गळा आणि डोक्याला आधार देते तसेच पाठीचा मणकाही ताठ ठेवते.जर तुम्ही पोटावर झोपत असाल तर मऊ उशीचा वापर करा.जर एका कुशीवर झोपत असाल तर मध्यम नरम उशीची निवड करा.जर तुम्ही सरळ पाठीवर झोपत असाल तर उशी थोडी कडक असावी. योग्य आहार-झोपण्यापूर्वी जास्त जेवण करू नये.जास्त जेवल्यास शरीराचे तापमान वाढते आणि झोपही येत नाही.याचा अर्थ असा नव्हे की,तुम्ही कमी जेवण करावे.रात्रीच्या जेवणानंतर केळी खाणे चांगले राहील.केळीत ट्रिपटोफोन नावाचे अँमिनो अँसिड आढळून येते.हे आम्ल शरीरात सेरोटोनिन हार्मोनच्या उत्सर्जनासाठी सहाय्यभूत आहे.ते मेंदू आणि शरीर शांत करते.चहा-कॉफीचे सेवनही कमी करावे. सप्लिमेंट्स घ्यावे-कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास झोपेची समस्या दूर होते.मॅग्नेशियम नैसर्गिक झोप आणणारे मिनरल मानले जाते.यामुळे तणाव कमी होण्यासही मदत मिळते.स्नायू आणि मेंदूचा तणावही कमी होतो.कॅल्शियमच्या कमतरतेमुळेसुद्धा झोपेची समस्या उद्भवते.दूध,ओट्स आणि अंजीरचे सेवन करावे. प्रकाश कमी ठेवावा-रात्रीच्या वेळी तीव्र प्रकाश असल्यास झोप येत नाही.खरे तर कमी...

सुख म्हणजे काय

* सुख म्हणजे नक्की काय? * *सुखाची नक्की व्याख्या काय?* वाढत राहण म्हणजे सुख का झिजत राहण म्हणजे सुख? का दुसऱ्यांसाठी झिजत झिजत वाढत राहण्यात खरं सुख?? सुखाचा खरा शोध लागलाय का कुणाला? का सर्वानी लावालीएत आपली जगणीच पणाला.. मनाच्या एका कोपऱ्यात साठत ते सुख… का आकाशाच्या पोकळीत लपत ते सुख… काळाची बंधन झुगारण म्हणजे सुख… का एखाद्या बंधानात जगण म्हणजे सुख… चेहऱ्यावर पसरणार हसू म्हणजे सुख… का आनंदाने ओलावानाऱ्या पापण्यात खरं सुख.. किती प्रकार या सुखाचे.. प्रत्येकाची आपली वेगळी व्याख्या.. कोणाला जिंकण्यात सुख मिळत तर कोणाला हरण्यात…. कोणाला काही मिळवण्यात सुख मिळत तर कोणाला कोणामध्ये तरी हरवण्यात … प्रत्येकासाठी सुखाची एक वेगळी ओळख आहे.. म्हटलं आज या सुखाचा चेहरा जरा चाचपून बघावा… नेहमीच रडत असतो आपण कोसळणाऱ्या दुखासाठी.. आज जरा सुखाचा पाऊसहि शोधून पहावा… पण एक मात्र खरं…जसं ढग जेवढा काळा तेवढी त्याची किनार सुंदर दिसते, तसच खूप दुखानंतर आलेला एखादा आनंदाचा क्षण पण खूप काही देऊन जातो… ते आनंदाचे छोटे छोटे क्षण अनुभवण्यात … ते जपण्यात आणि कुरवाळण्यात खरं सुख आहे…हे...

मैत्री :- एक अतुट नाते

मैत्री :- एक अतुट नाते .. -----------shri----------- आज निवांत बसलो होतो.तेवढ्यात एक फोन आला . समोरून एक व्यक्ती बोलत होता. मला म्हणाला ..नमस्कार मी अमुक बोलतोय. मी आपल्या फेसबुकवर चा मित्र आहे.आपली ए वर्षापुर्वी फेसबुकवर मैत्री झाली.पण आपल्याला भेटायची इच्छा होती.म्हणलं आज फोन करावाच ... म्हणुन फोन केला व त्या व्यक्ती ने भेटायची इच्छा जाहीर केली..सुरूवातीला मला वाटलं काहीतरी फसवणुक असेल  म्हणुन मी टाळाटाळ केली .पण त्याने दोनतीन वेळा फोन केला मग म्हणलं भेटुन बघावं व त्याला भेटायला बोलावलं .दुसऱ्या दिवशी तो आला.चांगला पदाधिकारी होता व उच्च पदनास्थ होता .मी ओळखले नाही पण त्याने ओळखले व मला म्हणाला नमस्कार मला तुम्हाला भेटायची इच्छा होती.ती आज पुर्ण झाली.मी त्याचे निरिक्षण केले तो खुपच मोठा व्यक्ती वाटत होता.. मी त्याला म्हणालो की, सर तुम्ही मोठे वाटत आहात व मी एक साधा माणुस मग मला भेटायची इच्छा का झाली.त्यावर तो म्हणाला .."कुणी छोटे नसते वा मोठे .. मैत्रीत सर्व सारखेच असतात.तुमची मैत्री मला खुप आवडली .. तुमचे संदर्भ व लेख मी आवडीने वाचतो.खरतरं मी नाही तुम्ही मोठे आहात." त्...

आधी वंदावे गुरू

   आधी वंदावे गुरू.. --------------------------- आपल्या जीवनात गुरूचे महत्व म्हणजे या देहाला जसे प्राणाचे .. साधना,भक्ती,जी कर्मे असतात.ते गुरू शिवाय पुर्ण होत नाही..कितीही ज्ञानी ,पंडित जरी असला तरी त्याचे सर्व व्यर्थ ज्ञान  आहे.गुरू हा आपल्या साधनेतील अहंकार दुर करतो.त्यांनी वाट दाखवलेले रस्त्यावर चालत राहील्यास तो मोक्षापर्यत घेऊन जातो. कितीही अडचणी जरी आले तरी गुरूचा वरदहस्त हा जखमेवरील मलमाप्रमाणे वाटतो व साधनेत अजुन दृढता येते म्हणुन म्हणतात.. *गुरुविण कोण दाखविल वाट* *आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर-घाट* म्हणुन साधना करताना गुरू करून जर केली तर ती लवकर फलद्रुप होते . शिष्यानेही गुरू हा सर्वोपरी समजुन पुजा करावी . गुरूचा हात जर डोक्यावर असेल तर ईश्वराचा कोपसुध्दा शिष्याला लागत नाही ..देव जर कोपला तर गुरू वाचवितो पण गुरू जर कोपला तर या समस्त ब्रह्मांडी सुध्दा तुम्हाला कोणी वाचवु शकत नाही.गुरूचा शब्द ,वचन,राग हे सर्व मुक्तीचे दारे असतात.शिष्याने फक्त त्याला धरावे व त्यादारापर्यत चालावे .   संत शिरोमणी तुलसीदास सुंदर शब्दात सांगतात :- *गुर बिनु भवनिध...

भस्म

   भस्म ………… ‘भ’ म्हणजे ‘भर्त्सनम्’ (नाश होणे) आणि ‘स्म’ म्हणजे ‘स्मरणम्’ (स्मरण करणे) थोडक्यात ज्यामुळे आमची पापे नाश पावतात आणि आम्हाला ईश्वराचे स्मरण होते, ते भस्म ! भस्मातील ‘भ’ म्हणजे सगळ्या पापांची निंदा करण्याचे द्योतक आहे, तर ‘स्म’ यातून शिवाच्या स्मरणाची आठवण होते. नुसती लाकूड व कुठलीही वस्तू जाळल्यावर जी राख उरते, तिला ‘भस्म’ म्हणत नाहीत, तर देवाची पूजा म्हणून यज्ञात आहुती दिलेले तूप, समिधा, इतर वनस्पती इत्यादी सर्व जाळल्यावर जे अवशेष रहातात, *त्यालाच ‘भस्म’ म्हणतात.* भस्म लावणे, याचा सांकेतिक अर्थ म्हणजे ‘दुष्कृत्यांचा नाश होणे’ आणि ‘ईश्वराची आळवणी करणे’ होय. भस्म आपल्याला ‘हे शरीर नश्वर आहे आणि एक दिवस त्याचीही राख होणार आहे; म्हणून आपण देहाची आसक्ती बाळगता कामा नये’, याची आठवण करून देते भस्माचा टिळा शिवभक्तीचे प्रतीक होय. भस्म हे विशेषकरून शिवाशी संबंधित आहे; कारण भगवान शिव सर्वांगाला भस्म लावतो. शिवभक्त आपल्या भालप्रदेशावर भस्माने त्रिपुंड्राकृती काढतात. कधी कधी लाल रंगाचा टिळाही या त्रिपुंड्राच्या मध्यभागी काढतात. तो टिळा शिवभक्तीचे प्रतीक मानला जातो. ज...